सातारा – प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत
१९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची नावे याप्रमाणे बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग),जावळी,कराड,खानपूर,खटाव,कोरेगाव,पंढरपूर,सातारा, तासगाव, वाळवा आणि वाई – होती. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.
>१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले. १८८४ ला मालाकामपेठ पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली.
भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली.
सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता.
दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.
१९६० मध्ये उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले. १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके, २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.
उपविभाग | नाव | दूरध्वनी |
---|---|---|
सातारा | श्री.सुधाकर जनाबाई साहेबराव भोसले | 02162-234395 |
कराड | श्री.अतुल सिंधु प्रताप म्हेत्रे | 02164-221378 |
वाई | श्री. राजेंद्र मंदाबाई दिलीप कचरे | 02167-227744 |
फलटण | श्री.सचिन मंगल भानुदास ढोले | 02166-222386 |
दिनांक २६/०७/२०१३ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार नव्याने निर्माण करण्यात आलेले उपविभाग
उपविभाग | नाव | दूरध्वनी |
---|---|---|
कोरेगाव | श्री.अभिजित बाळासाहेब नाईक | 02163-22300 |
पाटण | श्री. सोपान गोदावरी प्रभाकर टोंपे | 02372-283122 |
मान-खटाव | श्रीमती उज्जवला कुंडलिक गाडेकर | 02165-220161 |